ब्राह्मण सभा अमरावती ही एक पंजीकृत संस्था आहे. या संस्थेचा उद्देश समाजासाठी विविध सामाजिक शैक्षणिक वा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे असा आहे. गेल्या पन्नास पेक्षा अधिक काळापासून ब्राह्मण सभा विविध सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहे. सुमारे 78 वर्षांपूर्वी कै. कृष्णाजी गणेश सहस्त्रबुद्धे. कै. वासुदेव गणेश उर्फ काका तांबे, कै. दत्तोपंत नाटेकर इत्यादी मंडळींच्या प्रयत्नाने अमरावतीत ब्राह्मण सभेची स्थापन झाली. संस्थापक सदस्यांनंतर समजतील अनेक लोकांनी व कार्यकर्त्यांनी आपला वेळ-ऊर्जा देऊन संस्थेला आज मोठे केले आहे .
आजवर योगदान देणार्या सर्व लोकांचे आम्ही ऋणी आहोत त्यांच्या योगदानाशिवाय आज उभी असणारी ब्राह्मण सभा शक्य नव्हती. संस्था 16 नोव्हेंबर 1967 रोजी मुंबई ट्रस्ट Act खाली नोंदवली गेली असून रजिस्टर क्रमांक A/ 1413/अमरावती असा आहे.
ब्राह्मण सभेची दरोगा प्लॉट, राजापेठ, अमरावती येथे भव्य वास्तू आहे या वास्तूचा उपयोग समाजासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जातो.
सुरवात – ब्राह्मण सभेची मुहुर्तमेढ स्वतंत्र पूर्व काळात लावल्या गेली. त्याकाळी समजतील प्रतिथयश कै. श्री. दादासाहेब खापर्डे, कै. श्री. कृ. ग. सहस्रबुद्धे , कै. श्री. वा. ग. तांबे, कै. श्री. दत्तोपंत नाटेकर यांनी लावली. त्याकाळी ब्राह्मण सभेचे अनौपचारिक पद्धतीने कार्य चालत असे या कार्यातून प्रेरणा घेऊन सन 1967 साली ब्राह्मण सभेने नवीन कार्यकारणी स्थापून संस्था नोंदणीकृत केली. कै. श्री. बाबुरावजी गणोरकर , कै. श्री. रा या. महाजन, कै. श्री. रा गा कुलकर्णी, कै. श्री. शिदोरे , कै. श्री.वासुदेवराव खापर्डे या मंडळींनी या कार्यात पुढाकार घेतला. 1970-71 मध्ये खापर्डे बगीचा मध्ये स्वतःची जागा घेऊन सभेचे कार्यालय सुरु करण्यात आले.
1984 साली ब्राह्मण सभेचे केवळ 25 सदस्य आणि शिल्लक रुपये ३०० होते कै.श्री.. बाबुराव गणोरकर – अध्यक्ष, श्री वासुदेवराव खापर्डे – सचिव, रामभाऊ पसारकर – उपाध्यक्ष आणि सहसचिव – सुधीर कुलकर्णी या मंडळींनी ब्राह्मण सभेचे काम पुन्हा नेटाने सुरू केले
1989 दरोगा प्लॉट , राजापेठ येथे स्वतःची जागा खरेदी केली. या जागेचे भूमिपूजन पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते झाले व त्यावेळी असणार्या कार्यकारिणीने अत्यंत मेहनतीने वस्तु निर्माण केली.
नवीन इमारतीचे उद्घाटन पुण्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्री बिंदुमाधव जोशी यांचे हस्ते 2 ऑक्टोबर 1999.
2005 मध्ये ब्राह्मण सभेच्या विस्तारीकरणाची योजना करण्यात आली या विस्तारीकरणाचा अमरावतीचे दानशूर मंडळी चे कार्यकर्ते कै. श्री प्रभाकर राव कुलकर्णी यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ बारा लक्ष रुपयांची मोठी देणगी देऊन ब्राह्मण सभेचे उपकृत केले. या उदार देणगी मुळेच ब्राह्मण सभेची आजची वास्तू व सभेचे विकास योजना पूर्ण होऊ शकली बांधकाम पुर्ण झालेल्या सभागृहाचे नामकरण कै. श्रीमती जयश्री प्रभाकरराव कुलकर्णी सभागृह असे ठेवण्यात आले
सभागृहाचे उद्घाटन अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ महाराज मठाचे मठाधिपती श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले